टिकून
राहायला समूहाचा भाग असल्याची खात्री करत राहावं लागतं.
त्यासाठी
जबाबदाऱ्यांचे अतिसुलभीकरण करणाऱ्या म्होरक्याचा फार उपयोग होतो.
अर्थात
इथे समूहाने म्होरक्या वापरला स्वतःच्या जीवाच्या शांतीसाठी, गिल्टट्रीपमधल्या शॉर्टकटसाठी, दिवसभराचा त्रागा बाहेर
पाडण्यासाठी कि म्होरक्याने वापरून घेतले समूहाला कशाकशासाठी…
भावनेचं
राजकारण नको म्हणतो आपण …
पण
भावनाच राजकारण असली तर?
प्रत्येक
भावनेला सत्ता हवी असते आपली. स्वतःची मालकी.
म्हणजे
माण्साचं टिकणं हे स्व-च्या आणि समूहाच्या भावनेच्या राजकारणाच्या पटण्या-न-पटण्यानुसार
ठरत असावं का?...
लांब,वेगळं, अंतरावर राहूनही समूहाशी
जोडलेलं आहे असं वाटण्याच्या मागील असुरक्षिततेचं भांडवल करून एकदा सामुहिकाच्या
भावनेचे पुन्हा रिचार्ज केलं म्हणजे मग आपापल्या ‘छिद्रांत’ जायला नवी उर्जा मिळते
कि कारण ?
जबाबदाऱ्या
प्रतीकांच्या रुपात सजवायला बऱ्या पडतात. मिरवता येतात. निभावाव्या लागत नाहीत.
- प्राजक्ता.